शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

शहराचा पाणीपुरवठा १५ मार्चपासून खंडित : सिंचन विभागाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:06 IST

सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे मार्च २००६ पासून ते जानेवारी २०१८ पर्यंत तब्बल २ कोटी १७ लाख ४५ हजार रुपये थकबाकी आहे. दि. १५ मार्चपर्यंत थकबाकीची रक्कम अदा न केल्यास त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा

ठळक मुद्देजीवन प्राधिकरणकडे तब्बल २ कोटी १७ लाख ४५ हजार रुपये थकबाकी

सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे मार्च २००६ पासून ते जानेवारी २०१८ पर्यंत तब्बल २ कोटी १७ लाख ४५ हजार रुपये थकबाकी आहे. दि. १५ मार्चपर्यंत थकबाकीची रक्कम अदा न केल्यास त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा धोम पाठबंधारे विभागाचे उपअभियंता सुनील गोडसे यांनी दिला आहे. याबाबत जीवन प्राधिकरण विभागास नोटीसही बजावण्यात आली आहे. धोम पाटबंधारे उपविभाग क्रमांक दोनच्या अधिकार क्षेत्रातील कृष्णा नदीवरील क्षेत्र माहुली येथून सातारा शहर व उपनगरातील ग्राहकांसाठी (घरगुती वापरासाठी) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने पाणी उपसा करण्यात येतो. या पाणी उपसासंबंधातील मासिक देयक बिले व त्यासंबंधीच्या सूचना वेळोवेळी जीवन प्राधिकरणाकडे सादर केली जात असताना देखील प्राधिकरणकडून मार्च २००६ पासून आजअखेर संपूर्ण रक्कम अदा करण्यात आली नाही. त्यामुळे प्राधिकरणकडे बिलाची एकूण रक्कम १ कोटी ५५ लाख ७६ हजार व समायोजनेची ६१ लाख ६९ हजार अशी मिळून तब्बल २ कोटी १७ लाख ४५ हजार रुपयांची थकबाकी आहे.याबाबत मार्च २००६ पासून आजपर्यंत वेळोवेळी सूचना देऊन व पत्रव्यवहार करून देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून कोणतीही ठोस सकारात्मक कृती न केल्याने नाईलाजास्तव शहराचा पाणीपुरवठा खंडित करावा लागणार आहे. त्यानंतर निर्माण होणाºया जनप्रक्षोभास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सातारा सर्वस्वी जबाबदार राहील, असेही नोटिसीत नमूद केले आहे. याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित सिंचन विभागाला पत्राद्वारे कळविण्यात आल्याचेही धोम उपविभागीय पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे... तर सातबारावर थकबाकीचा बोजासंबंधित उपविभागाच्या अधिकार क्षेत्रातील भुर्इंज, शिवथर, सातारारोड व त्रिपुटी या शाखेतील शेती सिंचनाची एकूण २ कोटी १५ लाख २६ हजार रुपये थकबाकी येणे आहे. संबंधितांनी थकबाकीची रक्कम त्वरित अदा न केल्यास उन्हाळी हंगामात कालव्यात पाणी न सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाच्या विचाराधीन आहे. तसेच थकबाकीदार ग्राहकांच्या सात बारावर थकबाकी रकमेचा बोजा चढविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. 

कालव्यांच्या देखभाल दुरुस्तीचा वाढता खर्च, कर्मचाºयांचे वेतन व दैनंदिन प्रक्रिया खर्च तर दुसरीकडे थकबाकी रकमांचे वाढत जाणारे आकडे यांमुळे विभागाचा आर्थिक समतोल राखणे जिकिरीचे जात आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास त्याचा परिणाम विभागाच्या कर्मचाºयांचे वेतन, कालव्याची देखभाल व दुरुस्तीवर होणारा आहे. थकबाकीदार शेतकºयांनी सिंचनाची देयके अदा न केल्यास उन्हाळी हंगामात कालव्यात पाणी सोडणे शक्य होणार नाही.- सुनील गोडसे, उपविभागीय अभियंता